प्रतिनिधी/ शंकर सदार
अकोला: पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळामध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चौथा विजय मिळविलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले होते. याशिवाय दळणवळण मंत्रालय व ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री पदाचीही जबाबदारही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
हे पण वाचा: राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून जिल्ह्याचा बहुमान वाढविला. संजय धोत्रे यांना मात्र काही दिवसातच मंत्री पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठीने घेतल्याने जिल्हातील धोत्रे यांच्या चाहता वर्ग नाराज झाला आहे. तसेच पक्षातील अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरल्याचीही चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
हे पण वाचा: …अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!
जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज
संजय धोत्रे यांना मंत्रिपदावरून काढण्यात आल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्य, विकास कामांमधली कमी, अशी कारण पुढे करण्यात आली. पण यामध्ये काही तथ्य नाही. केवळ पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे धोत्रे यांचा बळी देण्याची भावना जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. केवळ नवीन लोकांना संधी देण्यासाठी हे सर्व फेरबदल करण्यात आल्याचेही भाजपच्या अंतर्गत गोटात बोलले जात आहे. एकाच म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना खूष करण्याचा हा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असल्याचीही माहिती आहे. पण यामुळे कुणीही खूष झालेले नसून नाराजी मात्र वाढली असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.
हे पण वाचा: मोठी बातमी: फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा
सतत चार वेळा खासदार
लोकसभेच्या १७ व्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार अॅड. संजय धोत्रे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शड्डू ठोकल्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपच्या अॅड. धोत्रे यांना होईल, असा कयास सुरुवातीपासूनच लावला जात होता. २०१४ मधील राजकीय पटलावरील घडामोडी व मोदी लाट पाहता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. यंदाच्या निवडणुकीत १८ लाख ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लाख १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी निवडणुकीत १ लाख ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यापैकी तब्बल १ लाख ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केले होते. ही वाढीव टक्केवारी खासदार अॅड. संजय धोत्रे यांच्या पारड्यात पडल्याचे निकालाअंती समोर आले.