मुंबई : राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे.आता खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरुन पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. देशातील दोनच राज्यात राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. त्यानंतर, पुन्हा एकदा राऊत यांनी मोदी सरकारला राज्यपालांच्या भूमिकेवरुन लक्ष्य केलंय.
देशात केवळ दोनच राज्यात राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये, असे राऊत यांनी म्हटले. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात, कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहे, म्हणून देशातील या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं सरकार असून जगदीप धनखार हे येथील राज्यपाल आहेत. मात्र, येथेही राज्यपाल आणि राज्य सराकरमध्ये सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातही भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळतं.
#WATCH आजकल पूरे देश में दो ही (जगह) राज्यपाल हैं, पश्चिम बंगाल और महाराष्ट्र। बाकी कहां राज्यपाल है या नहीं मुझे पता नहीं: संजय राउत, शिवसेना pic.twitter.com/B4UhhoVE1w
— ANI_HindiNews (@AHindinews) October 16, 2020
Read Also
CM ठाकरेंना घराबाहेर पडायला सांगणाऱ्या मनसेला कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले 'हे' उत्तरhttps://t.co/7wKsxqPbMF#DadaBhuse #Shivsena #CMThackarey #MNS @dadajibhuse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020