राहुल गांधींनी सांगितले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे काही दिवसांपूर्वी काँग्रेस मंत्री विजय वड्डेट्टीवर हे म्हणाले होते. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी अधिक प्रकाश टाकला आहे आणि हे सरकार पाच वर्ष टिकेल याबाबत खात्री व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना राऊत यांनी वड्डेट्टीवर यांच्या सत्तेतून बाहेर पडू या विधानाला देखील चांगलेच उत्तर दिले वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, “आमचा त्यांच्याशी संवाद चांगला आहे. राज्यातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही. आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे. राज्यातील सरकार कसं सुरु आहे हे दिल्लीतील नेत्यांना चांगले माहित आहे. त्यामुळे हे सरकार पडेल असं वाटत नाही,”
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याबाबत भाष्य केले होते त्यानंतर आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत मार्ग काढतील असे म्हंटले आहे. राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
अर्थखाते जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अजित पवार यांच्याकडे ते खाते आहे व नगरविकास खात्याचे काही वाटत नगरपालिकांना झाले असेल. आहे, असे बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. मात्र, आघाडी सरकारमध्ये एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढणे हे राज्य चालवण्याचा दृष्टीने सोयीचे असते,” असेही राऊत म्हणाले.
Read This Also
क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात गांगुलीची एन्ट्री ? कमळ हाती घेणार असल्याच्या चर्च्यांना उधाणhttps://t.co/zg5StleRho
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 25, 2020