सातारा: महाराष्ट्रात जागतिक महामारीने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमण होणाऱ्या रुग्णांची लाक्षणिक वाढ होत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या ही तीन लाखांच्या वर आहे. जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेत मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात देखील कोरोनाने मोठे संकट उभे केले आहे. दिवसाला तब्ब्ल २ हजार रुग्णांची आता साताऱ्यात वाढ होत आहे. या संदर्भात आता आमदार शिवेंद्रराजे भोसले MLA Shivendra Raje Bhosale यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
जिल्हा रुग्णालय, जम्बो कोविद सेंटर यासहित सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांतील बेड्स आता मिळेना झाले आहेत. रुग्णालयांच्या बाहेर आता रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अश्या या संकट काळात सातारा महापालिकेकडून नागरिकांसाठी कोणत्याही सुविधा देण्याचे काम होत नाहीये. महानगर पालिका जागतिक महामारीचा एवढा कहर चालू असताना कशी काय एवढी सुस्त बसून आहे असा संतप्त सवाल आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी विचारला आहे. MLA Shivendra Raje Bhosale’s appeal to Udan Raje
सध्या महाराष्ट्र आणि गोव्यात लॉकडाउन चालू आहे. खासदार उदयनराजे भोसले MP Udayan Raje Bhosale यांनी आता या प्रश्नात लक्ष घालावे अशी विनंती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. सातारा महापालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांचे पती डॉ. संजोग कदम हे आरोग्य उपसंचालक आहेत. पती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ पदावर आहे याचा फायदा तरी माधवी कदम यांनी सातारकरांना करून द्यायला हवा होता मात्र त्यांनी तसे केले नाही. महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये असे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटले आहे. सातारा ,महापालिकेने आता जबाबदारी ओळखुन चांगले काम करावे असे देखील त्यांनी या वेळी सांगितले आहे.