रायगड : शिवसेना सत्तेत जरी असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. यामुळेच शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.यामुळे राज्याच्या विविध भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
लॉकडाऊन काळात जनता विविध समस्यांनी त्रस्त झाली आहे. शहापूर तालुक्यात शिवसेनेचे तालुका नेतृत्व हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यात अनेक शिवसैनिक नाराज आहेत” असा दावा अविनाश जाधव यांनी केला.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच योग्य असल्याची स्थानिकांची भावना आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेचा झेंडा हाती घेतला, असेही अविनाश जाधव यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीतील सेना-भाजप कार्यकर्ते मनसेत
गेल्या महिन्यात कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
Read Also
राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत ना ? हे PM मोदींनी तपासण्याची गरजhttps://t.co/QYHMjyTZMk#BhagatsinghKoshyari #PMModi @BSKoshyari @PMOIndia
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020