मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत इतर पक्षाचा विचार करू असे म्हंटले होते.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील जळगावच्या दौऱ्यावर येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्या ऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार आहेत.
पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हयातील सिंचन प्रश्न, केळी पिकाच्या संदर्भातील पश्न, या विषयावरही चर्चा यावेळी करण्यात येणार आहे.
या वेळी एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा होण्याची शक्यता आहे. खडसे यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे त्यांनी पक्षात राहू नये असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार याबाबत चर्चा सुरू झाली.
शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येवून आढावा घेणार होते. मात्र आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष असणार आहे.
Read Also
भगवानगडाच्या विकासाची अपूर्ण कामे पुर्ण करा ! पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रhttps://t.co/MTjuxbkM1i#PankajaMundhe #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020