मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.आता पुन्हा एकदा कोश्यारी यांचे नाव चर्चेत आले आहे. मात्र यावेळी त्यांचे नाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रामुळे चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देत मंदिर उघडण्याचे आवाहन केले होते त्यावरच बराच वाद देखील झाला होता त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालांना फेटकारले होते हाच दुवा पकडत शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही,तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद.
पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे,उच्चपददस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्म वादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, असं शरद पवारांनी या पत्रात म्हटलं आहे.
Read Also
राष्ट्रवादीचा मोठा गेम ! खडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर ?https://t.co/P96ZoMTaFd#AanandShinde #Eknathkhadase #SharadPawar #NCP #AditiNalawade
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 28, 2020