मुंबई : मोदी सरकारनं तिन्ही विधेयकं संसदेत मांडल्यानंतर शिरोमणी दलानं आपली भूमिका स्पष्ट करत तडकाफडकी निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपाची साथ सोडण्याचाही निर्णय अकाली दलानं घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या पंजाबच्या राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांचं निर्णयाबद्दल अभिनंदन केलं. ‘कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!,’असं शरद पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
Congratulations to Shri Sukhbir Singh Badal President of @Akali_Dal_ and MP @HarsimratBadal_ who under the leadership of Hon. Shri Prakash Singh Badal pulled out of NDA in a protest to Farmers’ Bills. Thanks for firmly standing with the Farmers! @officeofssbadal
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2020
“शेतकऱ्यांच्या हितासाठी एनडीएशी असलेले संबंध तोडण्याच्या अकाली दलाच्या निर्णयाचं शिवसेना स्वागत करते,” असं ट्विट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Shivsena appreciates Akali Dal's decision to break it's ties with NDA in the interest of farmers.
@ office of badal@sukhbirsing Badal
@nareshgujaral— Sanjay Raut (@rautsanjay61) September 27, 2020