नवीदिल्ली : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधकांना राजकारण करायचंय,आम्हाला न्याय द्यायचाय असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही मला न्यायपालिकेवर शंका घ्यायची नाही. न्याय मिळेल असे वातावरण तयार व्हायला पाहिजे असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षणाबाबत आपले म्हणणे मांडले. तसेच ५० % पेक्षा आरक्षणाची मागणी गैर नसल्याचे सांगत,मराठा आरक्षण स्थगितीवर अध्यादेश हाच पर्याय असल्याचे देखील पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले होते.
मराठा आरक्षणाबाबत आमदार रोहित पवार म्हणतात . .https://t.co/An4ZfJ8YGE@RRPSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 11, 2020