मुंबई : नुकताच केंद्र सरकारने एक कृषी विधेयक पारित केले तसेच कामगार कायद्याबाबत देखील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून शेतकरी तसेच मजूर वर्गामध्ये मोठी नाराजी असल्याचे दिसून आले. केंद्राने जो कायदा केलेला आहे त्याबबद्दल काही दिवसांपूर्वी राज्याने सुद्धा विचारला केला होता आणि त्यावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तोच कायदा काही दिवसांनी केंद्राने पारित केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हंटले आहे. तसेच एकाच वेळी अंबानी सारख्या उद्योजकाने बिग बाजार सारखी कंपनी विकत घेतली आणि काही दिवसांतच हा कायदा आला हा योगायोग असेल असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी सूचक इशारा दिला.
भांडवशाही आणि खाजगीकरणाला फायदा मिळवून देणारा हा कायदा असल्याचे देखील यावेळी शिंदे यांनी सांगिलते. तसेच केवळ शेतकऱ्यांच्या नावाखाली हा कायदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कायद्यामुळे बाजार समिती आणि सहकार चळवळ संपली जाईल,व्यापारी शेतकरी अशा सर्वांसाठी हा कायदा अन्यायकारक आहे असे देखील शिंदे यावेळी म्हणाले.
Read Also
आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत घुसला कोरोनाबाधित आणि…
https://t.co/IEo761M9rW#RajeshTope— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020