मुंबई : राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नामांतराची घोषणा केली. त्याचबरोबर मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय देखील उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराला स्थगिती दिली आहे.
“आता जमिनीवर राहा, उगाच उडू नका, अन् लायकीत रहा”; निलेश राणेंचा केसरकरांना इशारा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 29 जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकार अल्पमतात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतले आहेत. त्यावर शिंदे सरकारने आक्षेप घेतला आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात शुकशुकाट.! तर फडणवीसांचं काम जोरात
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आज त्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 2019 च्या विधानसभेत शिवसेना , राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये युती झाली. त्यातच अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड केल्याने सरकार अल्पमतात आलं. तसेच सेनेचे जवळपास 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. ही सर्व परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची शेवटची कॅबिनेट बैठक बोलवली आणि त्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव धाराशीव करण्याची घोषणा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी आपेक्ष देखील नोंदवला मात्र नामांतराला आमचा कोणताही विरोध नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“सुरुवातीला विरोध होईल, पण चिकाटी सोडायची नाही”; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना गोपनीय मंत्र
त्यामुळे आपण संभाजीनगर च्या नामांतरचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. 1988 च्या औरंगाबादच्या महापालिकेत सेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेतली आणि त्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर आजतागायत शिवसैनिक औरंगाबादचं नाव संभाजीनगर असा प्रत्येक ठिकाणी उल्लेख करत आहेत. त्यानंतर 2005 मध्ये औरंगाबादमध्ये पालिकेत भाजप- शिवसेनेच्या युतीची सत्ता आली. त्यावेळी त्यांनी नामांतरचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र त्यावेळी औरंगाबादचे तात्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमत यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आव्हान दिलं होतं. आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं.
Read also
- “ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
- “लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”
- शरद पवारसाहेबांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी
- गुलाल उधळण्यास विलंब होणार; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती
- दिपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते?