मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा होणार नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे या दसरा मेळाव्याची चर्चेला सुरूवात झाली आहे. परंतु दसरा मेळावा हा फक्त मेळावा, भाषण, गर्दी एवढ्यापुर्ता मर्यादित नसतो. हा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आणि विचारांचं सोन लुटण्याची नेहमीची परंपरा आहे. हा मेळावा होणार हे ठरलेलंच आहे. मागच्या 56 वर्षापासुन हा मेळावा होत आहे. आणि याही वर्षी तेवढ्याच ताकदीने होईल. शिवसैनिकाच्या मनात कोणताही संधेय असण्याचं कोणतही कारण नाही, असं दसरा मेळ्व्यावरून अंबादास दानवे म्हणाले.
“टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
मेळावा जर शिंदे गटाला घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. त्याविषयी मी काही बोलायची गरज नाही. मात्र शिवसेनेचा मेळावा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा मेळावा होत असतो आणि तो शिवतीर्थावरच होणार. त्याच वेळेला आणि त्याच दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा इशारा विरोधी पक्षाला दिला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात महाप्रबोधन यात्रा निघणार आहे. यामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, असही अंबादास दानवे म्हणाले.
“शिवतीर्थवर होणारा ‘दसरा मेळावा’ म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे”
माझ्या माहिती नुसार 89 व्या वर्षी पी. व्ही. नरसिंहराव कोणत्याही चर्चेत नसताना हिंदुस्थानचे पंतप्रधान झालेले आपण बघितलं आहे. त्यामुळे वय हा मुद्धा पंतप्रधानपदासाठी मध्ये येऊ शकत नाही. तसच शरद पवार हे राज्यातील आणि देशातील एक अनुभवी व्यक्तीमत्व आहेत. मागे मोदीही म्हणाले होते की शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात अनेक गोष्टी करत असतो. देशची प्रश्न कसे सोडवायचे याचा अभायास आहे. देशासाठी एक चागलं नेतृत्व आहे असं निश्चित मला वाटतं, अस अंबादास दानवे शरद पवार यांच्याविषयी म्हणाले.
Read also
- सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
- “भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
- “शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
- “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
- भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार