काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर आता शिवसेनेने देखील आपली प्रतिक्रया दिली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या बाजूनं आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशाची प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका सांभाळण्यासाठी काँग्रेसला स्वत:ला सावरणं गरजेचं असल्याचं संजय राऊत यांनी सांगतिले.
दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली. एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.त्यावरून आज काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली.
BIG BREAKING
काँग्रेसची बैठक वादळी ! नेत्यांनी भाजपशी संगनमत केल्याचा राहुल गांधींचा आरोपhttps://t.co/LKQ6i9cf34#Congress #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 24, 2020