अभिनेत्री कंगना राणावतच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती, असे न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करत दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपुर्वी कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक संपुर्ण महाराष्ट्राने पाहिली.
आता न्यायालयाकडून कंगनाला दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटले, हे भाजपला मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
The actress called Mumbai Police mafia & Mumbai PoK. Do parties which are excited over Court order agree with this? Indecent remarks about judges or Courts lead to contempt, is it not defamation when someone makes such remarks about Maharashtra/Mumbai?: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/Dkh3TOfyGp pic.twitter.com/Kj8E0apF3C
— ANI (@ANI) November 27, 2020
राऊत म्हणाले की, अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी म्हटले. कंगनाला न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर उत्साही झालेल्या पक्षाला हे मान्य आहे का? न्यायालयाच्या निर्णयाविरोधात किंवा न्यायाधीशांविरोधात काही बोलणं हा कोर्टाचा अवमान ठरतो. पण मग महाराष्ट्र आणि मुंबईबाबत कुणी अशी वक्तव्य करत असेल तर ती बदनामी नाही का?
दरम्यान, आज मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात मुंबई महापालिकेने केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचे म्हटले आहे. तसेच, कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे.