नंदूरबार : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढावी लागणार आहे. तर तिकडे भाजपने कोणा सोबतही युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.
शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर, खुल्या प्रवर्गात या जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. अद्यापही सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुका रद्द होतील किंवा केल्या जाव्यात असं वाटत आहे. असं असलं तरी निवडणुका झाल्यास त्या स्वबळावर लढण्याचा नारा नंदुरबार जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी दिला आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणजे माजी खासदाराच्या माळेचा मणी; जुन्नर मधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तर स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढण्याचा नाराही देऊन टाकला आहे. काँग्रेसची भूमिका समोर येण्याआधीच या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे नाईलाजास्तव काँग्रेसलाही स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेना स्वतंत्र निवडणूक लढवून आपली ताकद जिल्ह्यात सिद्ध करेल असा विश्वास पक्षाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जिल्ह्यात आपलं गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र निवडणुकीचा नारा दिला आहे. पक्षश्रेष्ठींकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश देण्यात आल्या असल्याचं पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभिजीत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी दिसून येत असली तरी भाजप मात्र निवडणुकांसाठी तयार असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालावर नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता कोणाच्या हाती राहील? किंवा सत्तांतर होईल का? या प्रश्नांची ही उत्तरं मिळणार आहे. भाजपला या निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्यामुळे मतविभाजनाचा फटका त्यांना बसू शकतो.
Read Also :
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन; महादेव जाणकरांची गर्जना
- “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार
- पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल – संभाजी भिडे
- ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवा, शस्त्र पुरवतो; शिवसेना आमदाराचे वक्तव्य