पुणे : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मत माघतावेळी घरोघरो येवून बैलगाडा शर्यत सुरू करू असे आश्वासन दिले होते. निवडणूक होऊन २ वर्ष उलटले. मात्र अद्याप बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आलेली नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कोणी वालीच राहिला नाही. राजकीय नेते केवळ सत्तेच्या हव्यापोटी खोटी आश्वासने देवून मत गोळा करतात. मात्र निवडूण आल्यावर काहीच करत नाहीत. शिरूरच्या माजी खासदारानेही असेच आश्वासने दिली होती. आताचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही अशीच शेकऱ्यांची दिशाभूल केली आहे. सगळे आजी-माजी खासदार एकाच माळेचे मणी आहेत, अशी प्रतिक्रिया जुन्नर मधिल शेतकऱ्यांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदान घेण्याचे संकते – संजय राऊत
बैलगाडा शर्यतीला सद्य बंधी घालण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील अनेक शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात उत्साहित आहेत. त्यापद्धतीची तयारी करून त्यांनी बैलजोड्या सांभाळल्या आहेत. जुन्नर मधील शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरी बैलगाडा शर्यत सुरू होईल, या आशेने शेतकरी बैलजोड्या सांभाळत आहेत. बैलगाडा शर्यतीबद्दल जुन्नरच्या शेतकऱ्यांना प्रचंड उत्सुकता आहे. कारण अनेक गरिब लोक बैलगाडा यात्रेच्या निमित्ताने पोट भरण्यासाठी गोळ्या, बिस्कीट यांसारखे साहित्य विकण्यासाठी घेवून येतात. परंतू बैलगाडा शर्यत बंद झाल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या पदरी देखील निराश्या पडली आहे.
पडळकरांच्या गाडीवर हल्ला म्हणजेच, भाजपचा पब्लिसिटी स्टंट!
शिरूरचे माजी खासदारांनी शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतीबरोबरच अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. मात्र एकही पुर्ण केले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी मला निवडूण द्या, मी बैलगाडा शर्यत चालू करतो, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. निवडूण येवून दोन वर्ष उलटली. मात्र अद्याप शर्यत चालू करणे तर सोडा परंतू, शेतकऱ्यांच्या अडचणीकडे बघायला देखिल तयार नाहीत. त्यामुळे जुन्नर मधील शेतकऱ्यांना घोर निराशाची कुऱ्हाड कोसळली आहे. यावर प्रतिक्रीया देताना शेतकरी म्हणाले की, शेती करणे आम्हाला परवडत नाही, तरी पोटा पाण्यासाठी करावी लागते. अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यत बंद आहे. डॉ. अमोल कोल्हेंनी शर्यत सुरू करण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. परंतू त्या बद्दल काही एक निर्णय त्यांनी घेतला नाही. केवळ मतापोटी लोकांच्या कानामध्ये खोट्या अफवा पसरवल्या. आम्ही प्रयत्न करू असे सांगितले होते. मात्र काही एक प्रयत्न केले नाही. सगळी फसवी लोक आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपद निवडीवरुन महाविकास आघाडीत संभ्रम कायम?
परंतू शेतकरी राजा आता हुशार झाला आहे. यानंतर आशा फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही. आम्ही यांना निवडूण दिले. मात्र आमच्याकडेच लक्ष द्यायला तयार नाहीत. सगळे आजी माजी खासदार आमदार एका माळेचे मणी आहेत. कोणासाठी काही एक करत नाहीत. फक्त मतासाठी फिरतात. खोटी आश्वासने देतात. यांना फक्त खुर्ची प्यारी आहे. बाकी जनतेवरून काही एक देणघेण नाही. शेतकरी आज संकटात सापडला आहे. पण त्यांनीही एक लक्षात ठेवाव. आम्ही ठरवले तर सरकार बदलू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्यय करणे थांबवा, अशी प्रतिक्रिया जुन्नर मधिल शेतकऱ्यांनी दिली आहे.
Read Also :
- शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
- विधानसभेच्या अध्यक्षपद निवडीवरुन महाविकास आघाडीत संभ्रम कायम?
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदान घेण्याचे संकते – संजय राऊत
- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, भाजपकडून थेट अमित शाहांना पत्र
- ठाकरे सरकारचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय! केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही