मुंबई : जी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, दर महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव
यांनतर, या प्रकरणात अनेक चढउतार येऊन गेले. मात्र, आता याला विरोधी पक्ष अजून एक मोठे वळण देण्याच्या तयारीत असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता.
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आता, त्या दृष्टीने भाजपकडून पावले उचलली जात असून, भाजपचे प्रदेशाध्यत्र चंद्रकांत पाटील यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची, सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.
“होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!”
प्रदेश भाजपच्या १ कोटी १० लाख सदस्यांतर्फे, आपण ही मागणी करत असल्याचा दावा चंद्रकांतदादांनी केला असून, अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझेच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे, या दोघांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी भाजपची मागणी असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Read Also :
- चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!
- ‘राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांचा खोटारडेपणा अखेर उघड; त्या बैठकीचे निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर
- मराठा समाज त्यांच्या गाड्यांमागे धावला, त्यांनी समाजाला काय दिलं? चंद्रकांत पाटलांची पवारांवर टीका
- पब डिस्को बारला सवलतीचा प्रसाद, मात्र गणेश उत्सव बंदिवासात!
- तीन पक्ष आपापसात भांडतायंत का? हो तीन पक्ष भांडतायंत अन् जनतेला त्रास देतायं