मुंबई : नाना पटोले यांच्यानंतर रिक्त झालेले विधानसभा अध्यक्षपद, इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचे म्हणत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर इतरही काही महत्वाच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर आता, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर
राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवशेषन ५ जुलै आणि ६ जुलै या २ दिवशी पार पाडणार आहे. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजूनही कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात, भगतसिंग कोश्यारी यांनी, विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, अशी आठवण सरकरला करून दिली आहे. तसेच, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात देखील राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांना कार्यवाही करण्याचे या पत्रात सांगितले आहे.
मोठी बातमी! शरद पवार-मुख्यमंत्री भेटीत नेमकं घडलं काय, वाचा सविस्तर
पत्रात, कोश्यारी यांनी, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, अधिवेशनाचा कालावधी आणि OBC आरक्षणाबद्दल, २३ जून २०२१ रोजी राजभवन येथे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मला दोन निवेदने सादर केली असून, ताईत वरील मुद्द्यांवर आग्रहाने मागणी केली असल्याचे म्हटले आहे. तसेच, उपरोक्त विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत आपण कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावे, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
Read Also :
- कन्येने दिले उत्तर, “पात्रता पेक्षा जास्त मिळालं की असं होतं”; आता पडळकरांचे प्रत्युत्तर
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- पुणे महापालिकेतील २३ गावांबद्दल महत्वपुर्ण निर्णय; शाळा, जमिनी, अंगणवाड्यांचा असा होणार बदल
- राष्ट्रवादी काँग्रेसची महत्व पूर्ण बैठक; पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही?
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार