मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यपदासाठी आमचा पाठिंबा काँग्रेसला आहे. याचा पुनरुच्चार शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसने सोमवारी केला. एकदा का या पदासाठी उमेदवार निश्चित केला गेला की ही विषय वेगाने पुढे सरकू शकेल, असले तरी अध्यपदासाठी निवडणूक होणार की सभागृहातील सदस्यांची संख्या विचारात घेता मुख्य विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी आघाडीला आव्हान देण्याचे करील हे स्पस्ट झाले आहे.
अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराबद्दल काँग्रेसने निर्णय घेतलेला की तीन पक्षाचे नेते एकत्र बसून अतिम निर्णय घेतील, असे मला वाटते, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार सचिन सावंत यांनी सोमवारी म्हटले. सत्तेच्या वाटपाच्या व्यवस्थेनुसार अध्यक्षपद काँग्रेसकडे दिले आहे.
“हे ३ पक्षांचं सरकार ५ वर्ष टिकेल, शंका नसावी”- शरद पवार
“कुठलंही सरकार असूदेत, चालवताना प्रश्न निर्माण होतातच, हे प्रश्न समोर येतात, तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी एखादी यंत्रणा असावी, अशी चर्चा झाली आणि त्यानुसार तिन्ही पक्षांच्या वतीने ६ सहकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली गेली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात-अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे-सुभाष देसाई व राष्ट्रवादीकडून अजित पवार-जयंत पाटील आहेत,”
“सरकारच्या कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी, हे आमचे ६ सहकारी एकत्र बसतात, चर्चा करतात आणि त्यासंबंधी निर्णय घेतात. त्यांच्यामुळे सरकारमध्ये समन्वय आहे आणि याच पद्धतीने पुढे जाण्याची भूमिका सर्वांची भूमिका राहिली, तर सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, यात शंका नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.