मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात, पडद्यामागे काहीतरी शिजतंय, असं बोललं जात होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मुख्यमंत्र्यांची ३ दिवसात २ वेळा भेट घेतली. त्यानंतर तिथूनच ते शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर गेले. अशाप्रकारे ते सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत असल्याने, महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात होते.
“अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
यातच, आज वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे देखील वर्षावर उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे बडे नेते ‘वर्षा’वर दाखल झाल्यानंतर, सं. ४ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्यासोबत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परबही इथे दाखल झाले. त्यानंतर, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात तब्ब्ल अडीच तास चर्चा झाली.
त्यांच्या या भेटीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून कळत आहे…
आज अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावलं होतं. मात्र, देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हीसीद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. तसेच, त्यांनी ईडीला ७ दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे. यानंतर ईडीने चौकशीअंती त्यांना अटक केली, तर हा आघाडीसाठी मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे, डॅमेज कंट्रोल आणि ईडीच्या चौकशीला कसं सामोरं जायचं, या पार्श्वभूमीवर यात चर्चा झाली असू शकते.
आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
यासोबतच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकांच्या विरोधादेखील ईडीने कारवाई सुरु केली आहे. यादरम्यान, प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला. यावरदेखील यामध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
महामंडळ वाटप विषय आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा…
आघाडी सरकारला सत्तेत येऊन जवळपास २ वर्षे होत आली आहेत, मात्र तरीही महामंडळांचं वाटप झालेलं नाही. त्यामुळे, महामंडळाचं वाटप करुन, तिन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना दिलासा देण्याची चर्चा या बैठीकीत झाल्याचं सांगितलं जात आहे.
माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
तसेच, येत्या काही दिवसांत असणाऱ्या पावसाळी अधिवेशनातच, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, असा दावाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदाबाबतच्या निवडीवरुन, सातत्याने आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा, या बैठकीत झाली असल्याचं कळत आहे आणि अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरणार आहेतच, हे लक्षात घेता राजकीय स्ट्रॅटेजी काय असू शकते, यावरही चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
कोव्हिड निर्बंधाबाबत…
कोव्हिड निर्बंधाबाबत अन्य राज्यांनी काय निर्णय आणि उपाययोजना केल्या आहेत, हे पाहून त्यानुसार आपणही राज्यातील महामारीच्या परिस्थितीला अनुसरून निर्बंधांबाबतचे निर्णय घेतले पाहिजेत, अशी चर्चा महामारीबाबत या बैठकीत झाली असण्याची शक्यता आहे. सततच्या निर्बंधामुळे सामान्य जनतेत आणि व्यापाऱ्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे, राज्याची आर्थिक चक्रदेखील विस्कटते आहे. त्यामुळे, या निर्णयाचा आढावा घेतला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या अडीच तासाच्या चर्चेनंतर, शरद पवार सं. ६.४५ च्या सुमारास वर्षा बंगल्यावरुन सिल्व्हर ओककडे रवाना झाले.
Read Also :
- “अजितदादा, तुमचा हा निर्णय पुणेकर चांगलाच लक्षात ठेवतील; कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत”
- शासनाने जाहीर केलेल्या महामारी नियमांचा मान राखत, राष्ट्रवादीने थांबवला परिवार संवाद दौरा
- “मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्रंही पाठवले, तरी उत्तर आले नाही”, राजू शेट्टींची शरद पवारांकडे तक्रार
- मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री करणार समुद्राचंही पाणी गोड, निर्णयाचं केलं थेट इस्त्रायलनं कौतुक
- मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!