मुंबई : केंद्राच्या ३ नवीन कृषी कायद्यांविरोधात, दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता जवळपास ७ महीने पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या दरम्यान, राष्ट्रपतीव्दारा नियुक्त, देशभरांतील राज्यपालांना निवेदन देण्यात देण्यात आले. किसान मोर्चाकडून या मोर्चाला, “शेती वाचवा, लोकशाही वाचवा” असे नाव देण्यात आले होते.
मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री करणार समुद्राचंही पाणी गोड, निर्णयाचं केलं थेट इस्त्रायलनं कौतुक
या पार्श्वभूमीवर राज्यात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनदेखील, मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून, “या कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली, पत्रव्यवहार केला. मात्र, एवढे करूनही मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आलेले नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!
दरम्यान, मुख्यमंत्र्यांऐवजी, राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व इतर नेते उपस्थित होते. यावेळी, या सर्वानी त्यांच्याकडे, या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले. तसेच, राज्य शासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असाही आग्रह धरला.
मा. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले.@CMOMaharashtra pic.twitter.com/fjsBKMk7CO
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2021
“अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
यावर पवारांनी, “केंद्राने आणलेले नवीन कृषी सुधारणा विधेयके, शेतकऱ्यांना फायद्याची वाटत नाहीत. विविध शेतकरी संघटनांसोबतच, अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकांना तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे, कृषी सुधारणा व कामगार विधेयकांची अंमलबजावणी राज्यात होऊ नये, असाच आमचा प्रयत्न राहील,” असे सांगत, मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन, विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे.
Read Also :
- सार्वजनिक गणेशमुर्ती ४ फुटाची तर घरातील बाप्पा २ फुटाचा; यंदाही मुर्तीकारावर कोरोनाचे सावट
- शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये घडले नाराजी नाट्य, वाचा सविस्तर
- “वडेट्टीवार फन्टूस औलाद, त्यांनी आमच्या जिल्ह्यात येऊन दाखवावं”; भाजप आमदाराचे जाहीर सभेत आव्हान
- तीन पक्ष आपापसात भांडतायंत का? हो तीन पक्ष भांडतायंत अन् जनतेला त्रास देतायं
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला