भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध बिघडलेले असल्याचे सध्या दिसतेय. दरम्यान नेबाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील पूजनीय असलेल्या भगवान श्रीरामांविषयी विधान केले आहे. ते म्हणाले होते की, भगवान राम हे नेपाळी होते, तसेच भारतातील अयोध्या ही नकली आहे. तर खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा दावा त्यांनी केली होता. या दाव्यावरून नेपाळच्या पंतप्रधानांवर शिवसेनेने टीकास्त्र साधले आहे.
चीनची ‘रखेल’ असल्याप्रमाणेच ओली यांचे वर्तन असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. तर यांचे रामासंदर्भात विधान फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे, हिंदुस्थानातील अयोध्या खोटी, असा दावा नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी केला. हा दावा विनोदी आहे. नेपाळचे पंतप्रधान हे सरळसरळ चीनचे हस्तक आहेत. चीन नेपाळच्या माध्यमातून हिंदुस्थानात धार्मिक अस्वस्थता पसरवीत आहे. राम जन्मला कोठे, हा वाद नेपाळ निर्माण करतोय. रामाची सीता कोण, असे विचारण्याचाच हा प्रकार! असल्याचे म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर घणाघात केला आहे.