मुंबई : दोन दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांचे कोरोना आजारामुळे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची कोरोना आणि न्यूमोनिया आजाराशी झुंज सुरु होती. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईत शिवाजीपार्कवर अंतिम संस्कार करण्यात आले. याच शिवाजीपार्कमध्ये लतादीदींचं स्मारक उभारण्यात यावं यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यकडे मागणी केली आहे. यावरून बराच राजकीय गदारोळ झालेला पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा
यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका अशी आर्त हाक देशपांडे यांनी सर्वच राजकीय नेत्यांना हाणली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 8, 2022
काल शिवसेनेचे नेते संजय राऊत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मंडळी आहे तर स्मारकावरून राजकारण करू नका, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. आता मनसेनेही मैदान हे मैदानच राहावे असा सल्ला दिला आहे.
Read also:
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर
- मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे
- ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
- बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
- पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन