मुंबई : मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगना रानौतवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ही कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अध्यक्षांनी गृह विभागाला २४ तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कंगना रानौतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले होते.
https://twitter.com/PratapSarnaik/status/1302926203284631552?s=20
आता प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. “मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले,” असे ट्विटरच्या माध्यामातून प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
Read Also :
महाविकास आघाडीने सोयाबीनचे बोगस बियाणे दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसानhttps://t.co/yFYaBBKUto@cbawankule
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020