तीन पक्षाच्या सरकारमध्ये काहीच सुरळीत सुरु नाही असा आरोप वारंवार विरोधात असलेल्या भाजपकडून महाविकास आघाडीवर होत आहे त्यातच भर म्हणून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या झालेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
काय म्हणाले नाराज आमदार नेमकं
काल शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन स्वरूपात घेतली. कोरोना मुळे केले गेलेले लाॅकडाऊन, स्थानिक राजकारण अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यात काही आमदारांनी नाराजीचा सूर काढला. राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्या आमदारांची कामे पटापट होतात, व आमच्या कामांना हवी तशी गती मिळत नाही, अशी नाराजी या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्याचे समजते.
या आधी देखील काँग्रेसला कोणताही निर्णय घेताना विचारात घेतले जात नसल्याने काँग्रेसमधून देखील नाराजीचे स्वर उमटले होते. मात्र आता शिवसेना आमदारांनी थेट राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच बोट दाखवल्याचे दिसून आले.