पिंपरी : केंद्र सरकारने एक सप्टेंबरपासून महाराष्ट्राची व्हेंटिलेटर्स, पीपीई किट, टेस्टींग किट, एन ९५ मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. केंद्र सरकारने तात्काळ ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्यास पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. यापार्शवभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार बारणे यांनी निवेदन दिले आहे.
‘महाराष्ट्रात दिवसाला नवीन तेवीस हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. या कठीण परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्के आहे. राज्य सरकार अगोदरच आर्थिक संकटात आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा राज्याला अद्याप मिळाला नाही. या वैद्यकीय उपकरणासाठी आणखी मोठा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही वैद्यकीय मदत महाराष्ट्र सरकारला देण्याची आवश्यकता आहे. त्याची मागणी राज्य सरकारही सातत्याने करत आहे.” असेही ते म्हणाले .
Read Also :