नागपूर :शेतकरी विधेयकाला शेतकर्यांचा विरोध नाही, त्यांनी तर स्वागतच केले आहे.काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत असा घणाघात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. नुकत्याच केंद्र सरकरने पारित केलेल्या किसान विधेयकाबाबत फडणवीस यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत भाष्य केले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना आपण ज्या बंधनात अडकवून ठेवलं होत त्या बंधनातून सरकारने शेतकऱ्यांना आता मोकळं केलं आहे. त्यासाठीच काल संसदेत शेतकरी बिल पास करण्यात आले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस यांनी शेतकरी बिलाबाबत वक्तव्य केले आहे.
शिवसेनेवर जोरदार टीका
शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे असे म्हणत फडणवीस यांनी सेनेवर निशाणा साधला. शिवसेना लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.आमच्यासोबत सुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या मात्र त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल असे म्हणत शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
स्वतः पिकवलेल्या मालाला शेतकऱ्यांना अडत द्यावी लागते त्यामुळे काल जे विधेयक मंजूर करण्यात आले त्यातील एका विधेकामुळे एक देश एक मार्केट निर्माण करण्याची संधी मिळाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात.
आमच्यासोबत सुद्धा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या.
त्यांना आधी भूमिका घ्यावी लागेल.
शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही: देवेंद्र फडणवीस— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 21, 2020