मुंबई : नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ? असा देखील सवाल विचारला जात होता मात्र आता स्वतः खासदार संजय राऊत यांनी या भेटीबाबत पहिल्यांदाच उघड भाष्य केले आहे.
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी भेटीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना चर्चेवर खुलासा केला आहे.
संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता, राज्यपालांना भेटावं लागेल असा टोला त्यांनी लगावला.
Read Also
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का ? संजय राऊत यांनी केला ‘हा’ खुलासाhttps://t.co/lMnmoGNlsu#SanjayRaut #Shivsena #ChandrkantPatil #DevendraFadanvis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020