मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून, सत्य बाहेर येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Jalyukt Shivar Scheme was launched by previous govt & CAG in its report has stated that work has not been done as mentioned under the scheme. So, it is important that truth comes out: Maharashtra Minister Chhagan Bhujbal on state govt orders SIT probe into the scheme https://t.co/EuOSZJYVSb pic.twitter.com/JKuEQj7JsM
— ANI (@ANI) October 14, 2020
छगन भुजबळ म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना मागील सरकारने आणली होती. या योजनेअंतर्गत नमूद करण्यात आलेली कामं झालेली नाही. असं कॅगच्या अहवालात सांगण्यात आलं होतं. तर, सत्य बाहेर येणं मह्त्वाचं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यांनी देखील योजनेच्या चौकशीचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले असून, जलयुक्त योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे आता स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.