मुंबई : मनसेने पुन्हा एकदा मंदिर उघडण्याची आणि रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहेच. रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा. हवं तर त्याचं श्रेय तुम्हीच घ्या. तुमचं अभिनंदन करून हवं तर आम्ही ढोल वाजवू, पण हे कराच, असा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
कल्याण येथे आले असता बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व ठिकाणी मंदिर उघडली गेली आहे, त्यामुळे राज्यातही रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच मंदिरेही लवकरात लवकर उघडली पाहिजे. लोकांसाठी ते आवश्यक आहे. लोकांच्या भावनांचा सन्मान राखणे हे सरकारचं काम आहे. सरकारने ते केले पाहिजे. श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुमचं अभिनंदन करू, हवं तर ढोलही वाजवू, असा टोला नांदगावकर यांनी लगावला.
दरम्यान आज सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो असा घणाघात देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
Read Also ;
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना समान निधी दिला जातो, त्यात कोणताही दुजाभाव नाही : मंत्री अब्दुल सत्तार https://t.co/a092hwFI1E @AbdulSattar_99 @CMOMaharashtra @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020