मुंबई : मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. पोलीस भरती आणि राज्यातील इतर विभागातील परती प्रक्रिया आरक्षणाचा निर्णय घेईपर्यंत थांबवाव्यात अशी मागणी केली जात आहे. यातच आता खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित राज्यसेवा परीक्षा देखील पुढे ढकलावी आणि सर्वच जातीतील मुलांच्या वयाची मर्यादा वाढवली जावी अशी मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाचा तिढा आणि कोविड च्या पार्श्वभूमीवर, #राज्यसेवा_परीक्षा आणि सर्वच भर्ती प्रक्रिया पुढे ढकलणे बाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/xFlDDxwwgF
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 2, 2020
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण अंतर्गत भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश स्थगिती आदेशानंतर मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया लांबवलेली होती, आरक्षण स्थगिती नंतर लगेच कोरोनाचा प्रकोप सुरू असताना , ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असून MPSC कडून युद्ध पातळीवर त्याची तयारी सुरु झाली आहे . राज्यसेवा आयोगाने परीक्षा बाबत हॉल तिकीट वाटप सुध्दा सबंधीत विभागकडून वितरित केले आहे. आजही कॉरोना चा प्रकोप सुरूच असून याप्रकारे भरती प्रक्रिया राबवणे म्हणजे तरुणांच्या जीवाशी खेळन्याचा प्रकार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्या –
1 ) SEBC प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे अर्ज बुल्या प्रवर्गात वर्ग होताना, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराना लागू असलेले वय लागू होणार असल्यामुळे , मराठा समाजातील अनेक उमेदवार या मधून अपात्र होतील. त्यांना समान संधी देण्यासाठी वयाची मर्यादा वाढवून संरक्षण देणे आवश्यक आहे . सर्वच जातीतील मुलांच्या वयाची मर्यादा वाढवली जावी अशीही माझी मागणी आहे . जेणेकरून कुणाचेही नुकसान होणार नाही.
2 ) कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील अभ्यासिका व कोचिंग क्लासेस बंद असल्याने अनेक उमेदवार योग्य तयारी करु शकलेले नाहीत याचाही सहानुभूतीने विचार करण्यात यावा.
3 ) आरक्षणाला स्थागिती असल्याने संबंधित प्रवेश वर्ग होणार असले तरी यांचा मूळ अर्ज SEBC मधून असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्थागिती उठवल्या नंतर SEBC मधून खुल्या प्रवर्गात गेलेल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रिया SEBC आरक्षणामधून राबवल्या जाणार किंवा कसे याबाबत सुस्पष्टता शासनाने करणे आवश्यक आहे . आपण मराठा समाजाच्या मागण्याबाबत सुसपष्ट अशी भूमिका जाहीर करुन एम . पी.एम.सी.च्या परीक्षा घ्याव्यात.