जळगाव : भाजपच्या आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. आता हि दगडफेक नेमकी कोणी केली यामागे कुणाचा हाथ आहे, याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची बैठक जळगावात सुरु होती, बैठक संपल्यानंतर अज्ञात माथेफिरूंनी महाजांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनांवर जोरदार दगडफेक केली, सुदैवाने त्यात कुणी जखमी झालं नाही.
याविषयी बोलताना भाजपचे नेते दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले, कि हा हल्ला एका अज्ञात माथेफिरुद्वारा करण्यात आला असून याबाबत आम्ही कुठलाही गुन्हा दाखल केला नाही, लवकरात लवकर यामागचे कारण कळेल असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे.
त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
Read Also :
अनेक नेते पंचतारांकित रुग्णालयात, मात्र फडणवीस सरकारी रुग्णालयात: प्रवीण दरेकर https://t.co/TwumY0OTem @mipravindarekar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020