महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे.असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला.
त्यांच्या नाकर्तेपणामुळेच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुुरू असलेले आरक्षण जातेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आणि म्हणून उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना काळे कपडे घालून,मशाली पेटवून विरोध करणार असल्याचेे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले आहे.
विनायक मेटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जर मराठा समाज बांधवांचा आरक्षणाविषयीचा उद्याचा आवाज ऐकला नाही तर १७ ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल.आणि जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले. शनिवारी ( दि. 8) पुण्यात विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.