मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या निंबलनाच्या कारवाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वेळ लागेल आणि तोपर्यंत 16 बंडखोर आमदारांवर कारवाई होणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. जेष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला होता.
“भाजपने मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंशी संवाद साधवा”; दिपाली सय्यद
महाराष्ट्रबाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी असं कबिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. मात्र या कारवाईवर खंडपीठ नेमण्यासाठी बराच वेळ लागणार असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे. तर जो पर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत अध्यक्षांना 16 आमदार निलंबन करण्याचा कोणताही अधिकार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
“एकनाथ खडसेंची सध्याची अवस्था म्हणजे मंदिरात गेले अन् चप्पल चोरीला गेली”
महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय असो की नवीन सरकार स्थापनेचा आणि राज्यपालांच्या अधिकारांचा. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ या सर्व प्रकरणांची सुनावणी करणार आहे आणि तोपर्यंत आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेता येणार नाही. कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आणि म्हणाले की, उद्या विधानसभेत अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होईल. त्यामुळे SC आमच्या याचिकेवर सुनावणी घेत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यापासून रोखावे.
“दिल्ली दौर्याचा राजकीय अजेंडा नाही, खातेवाटपांवर चर्चा झाली नाही”; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही त्यामुळे आमच्यासोबत न्याय होईल, हा विश्वास आम्हाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडले होते.
Read also
- “आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा निष्ठेचा मंत्र तुम्ही जपला”; ठाकरेंचा 16 आमदारांना भावनिक पत्र
- “आमच्या घरी आजही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे”; बंडखोर आमदार सदा सरवणकरांचं वक्तव्य
- “ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका होणार नाहीत”; निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- आषाढी एकादशीच्या नरेंद्र मोदींच्या वारकऱ्यांना खास शुभेच्छा; म्हणाले की..;”
- “पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिनचीट”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुत्रं फिरवली