मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात येत आहे. सरकारकडून आज याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठीकी वरून माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
‘मराठा आरक्षणाच्या स्थगीतीनंतर सरकारने आज बोलावलेली बैठक म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारची आहे.या स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणीक क्षेत्रात अनंत अडचणी येणार आहेत. सरकारने ताबडतोब विनंती याचिका दाखल करून मराठा समाजाला न्याय द्यावा , अशी मागणी धस यांनी केली आहे.
दरम्यान मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पर्यंत केला आहे. मराठा समाजाला योग्य ती मदत करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.