बीड : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लातुर – बीड – उस्मानाबाद मध्ये स्वराज्य संस्था तसेच अनेक ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका येतात. या योजनेंतर्गत पाठवलेले सर्व प्रस्ताव मागील सरकारच्या कार्यकाळात मंजूर करून ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील वाटप करण्यात आला होता. हा पहिल्या हप्त्यातील निधी खर्च झाला नाही म्हणून कोट्यवधी रुपये पडुन आहेत. यातील काही लाभार्थींनी विविध टप्प्यापर्यंत बांधकाम पूर्ण केले आहे, परंतु यांना दुसऱ्या हप्त्यातील ६० हजारांचा निधी मिळाला नसल्याने त्यांच्यावर बांधकाम बंद करण्याची वेळ आली असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
८ फेब्रुवारी २०१९ च्या गृहनिर्माण खात्याच्या GR नुसार आवास योजनेच्या लाभार्थींनी ज्या टप्प्यापर्यंत बांधकाम पूर्ण केले असेल त्या टप्प्यापर्यंत त्यांना २ ते २.५ लक्ष रुपये देता येतील. हि बाब बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलीय, परंतु लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनपर्यंत यावर कार्यवाही केली गेलेली नाही.
संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष यांनी हा GR पाहुन लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी व लाभार्थींना पुढील हप्त्यातील निधी वाटप करावा अशी मागणी धस यांनी यावेळी केली. अालेला निधी विविध बँकांमध्ये ठेवून त्यावर व्याज मिळवण्याचा प्रकार नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकां कडून चालु आहे तो बंद करावा असे देखील धस यावेळी म्हणाले.
Read Also
CM ठाकरेंना आलेल्या फोनचा NIA कडून तपास करा,’या’ मनसे नेत्याने केली मागणीhttps://t.co/DqplLecsY3@SandeepDadarMNS @mnsadhikrut
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020