पुणे : सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने एनसीबी, सीबीआय एका ड्रग रॅकेटपर्यंत पोहचले व त्याचे धागेदोरे सध्या ते शोधत आहेत. असे असताना ड्रग रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? अनिल देशमुख त्यासाठी दबाव आणत आहेत का ? हे सरकार ड्रग्ज माफियांना वाचवू पाहत आहे का ? या प्रश्नांची उत्तरे आधी अनिल देशमुखांनी द्यावी आणि मगच देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करावी असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अजून सीबीआयचा अहवाल आलेला नाही. एम्सने अहवालाबाबत सीबीआयला विचारावे, असे स्पष्ट केले आहे. असे असताना त्याबाबत प्रतिक्रिया देण्याची घाई का ?,’ असा सवाल दरेकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला आहे.पुणे येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, बाळंतपण झालेले नसतानाच बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्यासारखा प्रकार अनिल देशमुख का करीत आहेत, हे ठावूक नाही.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती व भाजप नेत्यांवर थेट शब्दांत टीका केली. सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्यरित्या करत असताना मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधी पक्षाने केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर मुंबई पोलिसांच्या तपासावरच संशय घेतला. म्हणूनच महाराष्ट्राची ज्यांनी ज्यांनी बदनामी केली त्या सर्वांनी आता माफी मागायला हवी, अशी मागणीच देशमुख यांनी केली होती.
Read Also
८० हजार बनावट अकाऊंट्स तयार करणं , हा किळसवाणा प्रकार : सुप्रिया सुळे https://t.co/IJbNHh2iYS @supriya_sule #NCP @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020