अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सध्या सीबीआय करत आहे. याप्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलचं तापलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी याप्रकरणावरून मुंबई पोलिसांवर निशाणा साधणारे ट्विट केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे. देवाच्या दारात न्याय मिळण्यास थोडा विलंब होत असेल, मात्र जेव्हा शिक्षा भेटते ती अगदी कठोर असते असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
किसी के साथ ग़लत करके अपनी बारी का इंतजार ज़रूर करना !! ईश्वर की ‘न्याय की चक्की’ थोडी धीमी ज़रूर चलती है, पर ‘पिस्ती’ बहुत बरिक है ! #karma #JaiHind pic.twitter.com/m5CuSHcDh0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 28, 2020
त्यांनी न्यायदेवतेचा तराजू असलेला फोटो शेअर करत त्यांनी हिंदीत ट्विट केले की, किसी के साथ ग़लत करके अपनी बारी का इंतजार ज़रूर करना !! ईश्वर की ‘न्याय की चक्की’ थोडी धीमी ज़रूर चलती है, पर ‘पिस्ती’ बहुत बरिक है !
आआधी काही दिवसांपुर्वी सुशांत प्रकरणात ट्विट करत त्यांनी म्हटले होते की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही.