संजय राऊत यांनी ‘सामना’च्या आपल्या ‘रोखठोक’ या सदरात सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते.
संजय राऊत केलेल्या वक्तव्यांबद्दल त्यांना सुशांतच्या चुलतभावाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. राऊत यांनी आपण केलेल्या वक्तव्यांबद्दल येत्या ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.
संजय राऊत म्हटले होते की, सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते. “सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपास करीत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत कुणाला संशय घ्यायचा आहे, टिका करायची आहे, त्यांनी ते करावे. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका घेणे चुकीचं आहे. या प्रकरणी चाळीस दिवसानंतर पाटण्यात गुन्हा दाखल होतो. याचा तपास सीबीआयने करावा, यासाठी बिहार सरकारने केंद्रसरकारकडे तगादा लावला होता. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला. हा सारा घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल की यामागील सूत्रधार कोण आहे. पडद्यामागून कोण हालचाली करीत आहेत, कोण पटकथा लिहित आहे, हे लवकरच समजेल. कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल”, असेही राऊत यांनी म्हटले होते.