शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.
हेही वाचा..श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी घेतला पुढाकार ; म्हणून महायुतीला देऊया साथ..!
“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.
हेही वाचा…“भावजयीचा पराभव करण्यासाठी नणंद मैदानात”, सासरा सुनबाईंच्या प्रचारात
ही देशाची निवडणूक आहे, त्यामुळे कुणीही भावनिक होऊ नका. तुम्हाला विकास हवा असेल तर सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायला हवा. असं म्हणत शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, परंतु मी त्यांचा मुलगा नाही. अशी खंत देखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली. तर शिरूरच्या खासदाराने कोणत्याही गावाचा विकास केला नाही. ते निवडून गेल्यानंतर कुठेच फिरकले नाहीत. अशी टिका देखील अजित पवारांनी कोल्हेंवर केली.
माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…शिवाजीराव आढळराव पाटलांना विविध संघटनांचा पाठिंबा
हेही वाचा..“आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय”, अजिदादांचा कोल्हेंवर निशाणा
हेही वाचा..“विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र”, मोहोळांचा पुण्यासाठी जाहिरनामा