बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी कोरोना रुग्णाचे बळी आणि तुंबलेली मुंबई यावरून महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. त्याला कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात की, “कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची सत्ता असलेला महाराष्ट्र कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यात आता मुंबई पावसाच्या पाण्यात बुडू लागली आहे.’
ट्विटमध्ये मोदी यांनी पुढे म्हटले आहे की, “बिहार सरकार मात्र आत्तापर्यंत केवळ 388 कोरोनाबाधित रुग्णांना वाचवू शकलेले नाही. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकाच दिवसात (ता. 6 ऑगस्ट) 316 जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत 43 हजार 820 नागरीक कोरोनाला हरवून घरी परतले आहेत.’
कांग्रेस-शिवसेना-एनसीपी शासित महाराष्ट्र कोरोना का हॉट स्पॉट बना हुआ है। वहां मृतकों की संख्या 16 हजार पार कर चुकी है और मुम्बई बारिश के पानी में डूब रही है।
— Sushil Kumar Modi (@SushilModi) August 7, 2020
सचिन सावंत यांनी दिले प्रतीउत्तर
मोदी यांच्या या टिकेला महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार प्रतीउउत्तर दिले आहे. सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुशीलकुमार मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस असते, तर कोरोना रुग्णांची संख्या बिहारपेक्षा कमी दिसली असती कारण फडणवीस तुमच्यापेक्षा खोटं बोलण्यामध्ये अनेक पाऊल पुढे आहेत असं म्हणत सावंत यांनी मोदी आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
मुंबईच्या पावसाची चिंता तुम्ही करू नका. बिहार राज्याला आपल्या सरकारने पुराशिवाय जे बुडविले आहे, ते पाहून बिहारची जनता आपल्याला निवडणुकीत नक्कीच बुडवेल.’
मा. @SushilModi जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री अगर फडणवीसजी होते तो कोरोना मरीजोंकी संख्या बिहारसे भी कम दिखती। आखिर झूठ बोलनेमें वे आपसेभी कई कदम आगे है। और मुंबईके बारिशकी चिंता न करें। बिहारको बाढ़ के अलावा आपकी सरकार ने जो डुबोया है, बिहारकी जनता चुनाव में आपको जरूर डुबायेगी। https://t.co/6t3g9e7u9z
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 7, 2020