नवी दिल्ली : कृषि विधेयकावरून संसदेत गोधंळ घालण्याऱ्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपले मत मांडत या खासदारांना केवळ केवळ अधिवेशनापुरतेच नव्हे तर एका वर्षासाठी निलंबित केले पाहिजे, असे म्हटले आहे.
हंगामा करने वाले सांसदों को पहली गलती पर एक वर्ष और दूसरी गलती पर संसदीय कार्यकाल तक निलंबित किया जाए और भविष्य में ऐसी घटनाओं पर रोकथाम के लिए संसद में विधेयक लाना जाना चाहिए
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 22, 2020
रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे. गोंधळ घालणाऱ्या खासदरांच्या पहिल्या चुकीबद्दल एक वर्ष आणि दुसऱ्या चुकीबद्दल संसदीय कार्यकाळापर्यंत निलंबित केले जावे आणि भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी संसदेत एक विधेयक आणले गेले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले.
MPs should be suspended for a year not just for a session for their unlawful behaviour. Moreover, if they still behave like this then they should be suspended for the rest of their term. Such law should be formed in the house: Union Min Ramdas Athawale on his letter to PM (22.09) pic.twitter.com/9cb7uD5A29
— ANI (@ANI) September 22, 2020
दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, रिपन बोरा, नझीर हुसेन, माकपचे के. के. रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह यांचा समावेश आहे.