औरंगाबाद : देशात जवळपास 15 ते 16 राज्ये आपले आहेत. तसेच पंतप्रधानही आपले आहेत. मनातला कार्यकर्ता बनायचे असेल तर काम केले पाहीजे. कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सर्वांनी पक्षाच्या कामाचा माणूस हेरुन त्याला पक्षात घ्यायला पाहिजे. ” तसेच, राजकारणात भविष्य कोणालाच नसतं; भविष्य आपल्यालाच आपलं भविष्य घडवायचं असतं असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना दिला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या
रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात येणाऱ्या निवडणुकांपैकी सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. ग्रामपंचायतीसाठी भाजप पक्षाची रचना करा. गावातील कामाचा माणूस हेरा. त्याला पक्षात घ्या. ग्रामपंचायतीला पहिलाच फटका बसला तर पुढे काही खरं नाही, असा सावधानतेचा इशारा त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. तसेच जो कष्ट घेईल त्याचेच भविष्य पक्षात ठरेल. माणूस काजू बदाम खाऊन नाही तर ठोकरा खाऊन हुशार होतो असंही ते म्हणाले.
भाजप परिवार तर काँग्रेस परिवाराचा पक्ष
दरम्यान, भाजप हा एक परिवार आहे. भाजप जनतेचा पक्ष आहे. तर काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका दानवे यांनी काँग्रेसवर केली. त्यानी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र डागले.
Read Also :
मराठा आरक्षणासाठी मराठा संघटना काढणार मोर्चा, 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार https://t.co/kuPKsheBB8 @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020