मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत वेध लागले आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी येत्या २६ जुन रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीपुर्वीच ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झालाय. त्यावरून आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीबाबत दिल्लीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यात कोकण आणि नाशिकबाबत समझोता झाला आहे. असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चारही मतदारसंघात आम्हाला न विचारता ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यासाठी ठाकरेंनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आज ठाकरे यांनी भाष्य करत नाशिक आणि कोकणाची जागा कॉंग्रेसला सोडण्यास ठाकरे तयार असल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?
हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्…
हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ?
हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार