सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवीन नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वच क्षेत्रातील अनेक लोक यावर भाष्य करत आहेत. सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला मोठा झटका दिला. जर सुशांतसिंह याचे कुटुंबीय सीबीआयची मागणी करीत होते हे प्रकरण सीबीआयकडे का दिले नाही असा सवाल न्यायलयाने महाराष्ट्र सरकारला केला आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी देखील आता या प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करू दिलं असतं त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नसता तर नामुष्कीची वेळ आली नसती महाराष्ट्र सरकारचा खोटा अभिमान आणि काही बड्या लोकांना वाचवण्याची धडपड लपून राहिली नाही हे विशेष अशा प्रकारचे ट्विट करून राम कदम यांनी राज्य सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत.
महाराष्ट्र सरकारने #MVA @CPMumbaiPolice मुंबई पोलिसांना मोकळेपणाने काम करू दिलं असतं त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नसता तर नामुष्कीची वेळ आली नसती महाराष्ट्रसरकारचा खोटा अभिमान आणि काही बड्या लोकांना वाचवण्याची धडपड लपून राहिली नाही हे विशेष #SushantSinghRajput #SushantTruthNow
— Ram Kadam (@ramkadam) August 5, 2020
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या CBI चौकशीस मान्यता दिली आहे.