पुणे : जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्क होते. यापेक्षा दुप्पट मताधिक्क मोहोळ यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बुथवर ७५ टक्के मतदान होणे व त्यातील ७५ टक्के मतदान महायुतीला होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. काल महायुतीकडून मोठं शक्तिप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…अनंत गीतेंच्या विरोधात मतदारांचा प्रचंड रोष, बॅनरबाजी करत गीतेंवर साधला निशाणा
तर पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून २०१४ व २०१९ मध्ये जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहारात चांगले काम केले आणि आता तरूण तडफदार उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. महायुतीमध्ये सर्व काही योग्य पद्धतीने सुरू असून, मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभी आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्याच्या पुढील ५० वर्षाचा विचार करून शहरात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने कामे सुरू केली आहेत. पुणे देशातील प्रथम क्रमांकाचे शहर व्हावे. नागरिकांचे जीवनमान उंचवावे, यासाठी पुढील काळात पुणे शहर आणि परिसरात ५० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. शिक्षणाच्या आणखी चांगल्या संधी निर्माण होणे, नवीन उद्योग आणणे, रोजगारनिर्मिती करणे, पायाभुत सुविधा निर्माण करणे यासाठी ही निवडणुक लढवत असून पुणेकर मला नक्की विजयी करतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहे,” जुन्नरकरांसाठी आढळराव पाटील देणार मोठी भेट
हेही वाचा…“मोदींना गरिबीची जाण, बारामतीतही महायुतीचा उमेदवार विजयी होणार”, रामदास आठवलेंचं वक्तव्य
हेही वाचा…“डमी नाही, डॅडी उमेदवार,” , ‘त्या’ टिकेला आढळरावांनी कोल्हेंना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची संपत्ती किती ? वाचा आकडेवारी