रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी मुंबई येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. ही कारवाई पाहून आणीबाणीच्या काळाची आठवण होत असल्याचे, भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आले. शिवाय, राज्य सरकारविरोधात भाजपाकडून आंदोलन देखील केले जात आहे.
भाजपा नेत्यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. सरकार विरोधात लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करताना, विविध माध्यमांना त्रास देताना भाजपा नेत्यांना आणीबाणी आठवत नाही? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
”पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. असं म्हणत, ”पण याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप, ‘सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा?” असं देखील आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
पण याच 'अभिनेत्या'मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप,'सोशल मीडिया हब'सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही.हा कसला दुटप्पीपणा?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 4, 2020