कोरोनाच्या संकटात शैक्षणिक क्षेत्रालाही सर्वात मोठा फटका बसला आहे. अनलॉकची घोषणा करत केंद्र सरकारने अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु केल्या पण शाळांचा यात समावेश नव्हता. मात्र आता शाळा टप्प्याटप्प्याने कशा सुरु करता येतील याबाबत केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करत आहे
1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक 4 च्या ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही नियमावली राज्यांना दिली जाऊ शकते.
शाळा सुरु करताना सरकारचा प्लॅन नेमका कसा असू शकतो?
- दहावी ते बारावी या वयोगटातल्या शाळा आधी सुरु होऊ शकतात.
- नंतर पाचवी ते दहावीचे वर्ग सुरु होऊ शकतात
- शाळा दोन शिफ्टमध्ये चालवाव्यात…एक सकाळची शिफ्ट आणि दुसरी दुपारची शिफ्ट
- दोन शिफ्टच्या मध्ये एक तासांचं अंतर असावं, ज्यात वर्ग सॅनिटायझ करण्यात येतील
- पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्ग सुरु करण्याबाबत मात्र इतक्यात केंद्राचीही अनुकूलता नाही.
अर्थात शाळा सुरु करण्याबाबत केंद्राने गाईडलाईन्स केल्या तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारांवरच सोपवला जाणार आहे. त्या त्या ठिकाणी कशी स्थिती आहे त्यानुसार राज्य सरकारं हा निर्णय घेतील, असंही केंद्राने म्हटलं आहे.