सोलापूर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला होता.
केंद्र सरकार तर मदत करेलच मात्र, राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही, स्वतःची जबाबदारी झटकून कसे चालेल, असा जाब विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. पंचनामे झाले पाहिजेत, असा अट्टाहास न करता केवळ मोबाईलवर आधारित फोटोही पंचनाम्याचा पुरावा मानला जावा, ही पद्धत आम्ही आमच्या सरकारमध्ये लागू केली होती, त्याप्रमाणे तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी करत सरकारने जबाबदारी झटकू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही.
फडणवीस म्हणाले, “केंद्र सरकार मदत करतेच मात्र ती राज्याला मिळण्यासाठी वेळ लागतो. आमच्या सरकारच्यावेळी आलेल्या पूरस्थितीवेळी दहा हजार कोटींची मदत आम्ही जाहीर केली होती. प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलून चालणार नाही. या सरकारने स्वतःची जबाबदारी ओळखून कामाला लागले पाहिजे.
शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची वाट न पाहता थेट मदत करा. टोलवाटोलवीचे राजकारण करू नका, केंद्र मदत करेलच पण तुम्हीही सरकार म्हणून जबाबदारी उचला.” शरद पवार माजी कृषीमंत्री आहे केंद्राच्या मदतीची पद्धत त्यांना माहिती आहे. मात्र, टोलवाटोलवी करून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Read Also :
बस झाले पाहणी दौरे, आता थेट मदत करा! शेतकऱ्यांची मागणी https://t.co/ofBhgqFXfj @NCPspeaks @INCMaharashtra @ShivSena @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020