मुंबई ; टाळेबंदीच्या काळात शाळेतील फी वाढीच्या तक्रार आल्यानंतर त्यासंदर्भात अनेक संघटनांनी आंदोलने केली होती, म्हणून मंत्री बच्चू कडू यांनी त्या सर्व शाळांची चौकशी करून त्या संबंधित शाळांची ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या निर्णयाला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विरोध करत हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीच वातावरण असल्याचं कारण त्यांनी दिले आहे. यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री बच्चू कडू हे शेतकरी नेते आहे, शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत आले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना जी मदत जाहीर झाली त्यावर हि त्यांनी आपली प्रतिक्रया व्यक्त केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वाधिक मदत करण्यात आलीय.भाजप सरकारच्या काळात दर हेक्टरी 8 हजार रुपये देण्यात आले होते. आम्ही शेतकऱ्यांना 10 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असल्याचे कदम यांनी सांगितले.
दरम्यान नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. असा देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे.
Read Also :
अजित पवारांनी एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादीत आपल्या स्टाईलने केले स्वागत…https://t.co/D6FxoDDeGd@AjitPawarSpeaks @EknathGKhadse @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020